'केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा'

लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाचे पोलिसांना आदेश

'केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा'

बंगळुरू: वृत्तसंस्था 

निवडणूक रोखे प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर गुन्हा दाखल करून प्राथमिक माहिती अहवाल नोंदवून घेण्यात यावा, असे आदेश येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार टिळक नगर पोलीस ठाण्यात सीतारामन यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे. 

राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीत पारदर्शकता यावी यासाठी केंद्र सरकारने सन 2018 मध्ये निवडणूक रोखे अर्थात इलेक्टोरल बाँड योजना अमलात आणली. या योजनेनुसार स्टेट बँक ऑफ इंडियामधून कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी आपल्या आवडत्या राजकीय पक्षासाठी रुपये एक हजार, दहा हजार, एक लाख, दहा लाख, एक कोटी अशा रकमेचे रोखे घेऊ शकत होते. या रोख्यांची रक्कम संबंधित पक्षाला दिली जात होती. रोखे घेणारे व्यक्तीचे अथवा कंपनीचे नाव बँक आणि राजकीय पक्षाकडून गोपनीय राखले जात असे. मात्र, विरोधक आणि स्वयंसेवी संस्था यांच्या विरोधामुळे सर्वोच्च न्यायालयाने ही योजना रद्द केली आहे. 

निवडणूक रोखे प्रकरणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप जनाधिकार संघर्ष संघटनेचे आदर्श अय्यर यांनी केला आहे. त्यांनी निर्मला सीतारामन आणि अन्य संबंधिता विरोधात व्यक्तिगत तक्रार दाखल केली आहे. त्याची दखल घेऊन लोकप्रतिनिधींसाठी असलेल्या विशेष न्यायालयाने निर्मला सीतारामन यांच्यासह अन्य संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. 

 

 

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |
'मुस्लिम मावळ्यांनी समुद्रात फडकवला स्वराज्याचा भगवा'
'आरक्षण संपवण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांचे एकमत'
'किमान देवाला तरी ठेवा राजकारणापासून दूर'
खरगे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, पण...