'राजकारणाचे अध:पतन रोखण्यासाठी हस्तक्षेप करा'

मल्लिकार्जुन खरगे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन

'राजकारणाचे अध:पतन रोखण्यासाठी हस्तक्षेप करा'

नवी दिल्ली: प्रतिनिधी 

भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांकडून विरोधी नेत्यांवर ज्या भाषेत टीका केली जात आहे, त्यामुळे राजकारणाचे अध:पतन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये हस्तक्षेप करून खालच्या पातळीची टीका करणाऱ्या नेत्यांवर योग्य ती कारवाई करावी, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे. 

योग्य वेळी आरक्षण रद्द करण्याचा विचार करू. सध्या तरी ती वेळ आलेली नाही, असे विधान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यात केले होते. तसेच शीख समुदायाबद्दलही त्यांनी काही विधान केले होते.  या विधानावरून आरक्षणविरोधी असल्याचा आरोप करून भाजप आणि मित्रपक्षांकडून राहुल गांधी यांच्यावर कठोर टीका केली जात आहे. 

भाजपाच्या एका नेत्याने राहुल गांधी यांना त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्यासारखी अवस्था करून टाकू, अशी धमकी दिली होती तर शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्याला अकरा लाखाचे इनाम जाहीर केले आहे. 

अशा प्रकारच्या विधानांमुळे संतापलेले मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधानांना पत्र रवाना केले आहे. या पत्रात पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतानाच मोदी यांनी राजकारणाची पातळी कायम राखण्यासाठी त्यांच्या पक्षातील व मित्र पक्षातील बोलघेवड्या नेत्यांची कानउघाडणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 

देशाचे राजकारण सुरळीत चालावे यासाठी निकोप वातावरण आवश्यक असते. नेत्यांच्या बेताल वक्तव्यांनी हे वातावरण दूषित होत आहे. अशा वक्तव्यांनी केवळ राहुल गांधी यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसतो असे नाही तर देशातील राजकारणाची पातळी खालावत आहे. हा केवळ राहुल गांधी यांचा अपमान नाही तर विरोधी पक्षातील सर्वांचा अपमान आहे, असेही खरगे यांनी नमूद केले आहे. 

 

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

भोसरीत माजी आमदार विलास लांडे हाती घेणार तुतारी
'महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन करणार, हा आपला शब्द'
स्वतःच्या मुलींची लग्न दिली लावून, मग...
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |