राष्ट्रीय जनस्वराज्य सेनेची विधानसभा रणनिती निश्चित!
संजय ठाकरे यांचा राष्ट्रीय जनस्वराज्य सेनेत प्रवेश
सटाणा : विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपली असताना, राजकीय पक्षांनीही आपापल्या रणनितीला सुरुवात केली आहे. बागलाण विधानसभा हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने यामध्ये गेली अनेक पंचवार्षीक ह्या केवळ दोन घराण्यांपुरत्याच मर्यादीत राहील्या असल्यामुळे बागलाणची जनता जुन्या मातब्बर आजी-माजी आमदारांना वैतागली आहे.
त्याबरोबरच गेल्या वर्षी जूलै मध्ये मणिपुर घटनेवरुन आदिवांसी समाजाने काढलेल्या मोर्चाला काही विरोधी घटकांनी हिंसक वळन देवून होतकरु आदिवासी कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले, त्यानंतर एकही आजी-माजी आमदार त्या कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून आला नाही उलट दोन्ही आजी-माजी आमदारांनी आपापली राजकीय पोळी शेकत श्रेय लाटण्यासाठी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या या सर्व परिस्थितीमुळे नाराज झालेला आदिवासी समाज एक खंबीर नेतृत्वाच्या शोधात आहे.
या पार्श्वभूमिचा विचार करता राष्ट्रीय जनस्वराज्य सेनेने शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला या सर्वच घटकांच्या प्रश्नांना योग्य ती दिशा देण्याच्या दृष्टीने २०२४ च्या विधानसभा रणधूमाळीत दंड थोपटले आहे. याचाच भाग म्हणून बागलाणच्या पश्चिप पट्ट्यातील सर्वसमावेशक युवा नेतृत्व संजय ठाकरे यांनी राष्ट्रीय जनस्वराज्य सेनेमध्ये पक्षप्रवेश करत एकप्रकारे पुढील राजकीय संग्रामाचे सुतोवाच केले.
राष्ट्रीय जनस्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत, प्रदेशाध्यक्ष करण गायकर यांच्या हस्ते संजय ठाकरे यांचा राष्ट्रीय जनस्वराज्य सेनेत पक्षप्रवेश सोहळा ढोलबारे येथिल मार्केटच्या मुख्य सभागृहात पार पडला.
यावेळी संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार म्हणाले की, लोकशाही ही काही विशिष्ट लोकांच्या हातातील बाहूलं बनता कामा नये, शासनाने सर्व-सामान्यांचा विचार करुन धोरणं आखायला हवीत, संवैधानिक मूल्यै जपायला हवीत तरच त्या लोकशाहीला अर्थ असतो या ध्येयासाठी राष्ट्रीय जनस्वराज्य सेना कार्य करणार असून त्यासाठी येणारी विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था पूर्ण ताकदीने लढणार आहोत, असेही ते यावेळी म्हणाले.
छावा क्रांतीविर सेनेचे संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रीय जनस्वराज्य सेनेचे प्रदेशाध्यक्ष करण गायकर म्हणाले की, शासन जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहे, समाजात खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य, समता, बंधूता नांदायची असेल, छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे राज्य आणायचे असेल तर राष्ट्रीय जनस्वराज्य सेना उत्तम मार्ग आहे, त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत आपले अनेक मतदारसंघातून आमदार विधानसभेत धडकतील हा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी, राष्ट्रीय जनस्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश (नाना) पवार, प्रदेशाध्यक्ष करण गायकर, महासचिव गणेश पवार, सचिव संदीप साळवे, कोषाध्यक्ष रविंद्र जगताप, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. अमोल बच्छाव, विजय वाहूळे, सुभाष गायकर, वैभव दळवी, बाबूलाल ठाकरे, धनराज पवार, बाळू ठाकरे, भारतीय किसानसभेचे चिंतामण ठाकरे, पांडूरंग पवार, रमेश पवार, नितीन घरटे, केदारनाथ भागवत, चेतन वाघ आदिसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
000
Comment List